भरतनाट्यम आणि मराठी भक्तिगीतांचा अद्वितीय संगम; ‘भक्तीरंग’ हा पारंपरिक नृत्याविष्कार आज मालवणमध्ये

मालवण : भारतीय सांस्कृतिक परंपरेतील सर्वात नाजूक, अभिजात आणि भक्तीमय असा भरतनाट्यम आणि त्यासोबत मराठी भक्तिगीतांचा दिव्य संगम—हा अद्वितीय अनुभव देणारा ‘भक्तीरंग’ हा नृत्याविष्कार आज सायंकाळी भरड, मालवण येथील श्री दत्त मंदिरात रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. भरतनाट्यम नृत्यशैली, संगीत आणि भक्तीभाव यांनी परिपूर्ण अशी ही प्रस्तुती श्री दत्तगुरूंच्या करुणामय दर्शनाचा अनुभव देणारी ठरणार आहे….

कणकवलीत ९ नोव्हेंबरला भव्य वारकरी दिंडी सोहळा; हजारो वारकरी सहभागी होणार

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारकरी एकत्र येणार असल्याने संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. या दिंडीचे प्रस्थान सकाळी ८.३० वाजता एस.टी. वर्कशॉप…

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्य राज्यस्तरीय महोत्सवासाठी ९५ कोटी ३५ लाख ६४ हजार रूपये उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या…

बालकवींच्या कवितांचे गारुड शतकानंतरही कायम: ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ या कार्यक्रमात सतीश लळीत यांचे प्रतिपादन

बालकविता, निसर्गकविता आणि गूढगंभीर अर्थवाही कविता अशा काव्याच्या विविध प्रकारात बालकवींनी अत्यंत ताकदीने स्‍वच्छंद विहार केला. अवघे २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या विलक्षण प्रतिभावान कवीचे गारुड त्यांच्या निधनाला शतक उलटले तरी आजही टिकून आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी नुकतेच येथे केले. ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या आठव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते….

मालवणच्या सौ. राखी अरदकर यांची राष्ट्रीय स्तरावरील “कला-पुष्कर-राज रंगरेखा” विशेष चित्रकला शिबिरासाठी निवड

अ.शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथील कला शिक्षिका सौ. राखी हुन्नरे उर्फ राखी देवदत्त अरदकर यांची राष्ट्रीय स्तरावर आयोजित “कला-पुष्कर-राज रंगरेखा” विशेष चित्रकला शिबिरासाठी सन्माननीय निवड झाली आहे. राज्यभरातून चित्रकलेच्या क्षेत्रात वेगळे, नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या चित्रकारांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सौ. अरदकर यांची निवड हा मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या…

26 जुलै रोजी कुडाळमध्ये शिवचरित्र आणि दुर्गसंवर्धनावर मार्गदर्शन, प्रदर्शन आणि व्याख्यानांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून शिवप्रेमींनी ‘शिव अभिमान सोहळा’ आयोजित केला आहे. येत्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सभागृहात हा विशेष कार्यक्रम पार पडणार असून, यात विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र, दुर्गसंवर्धन, एमओडीपीआय मार्गदर्शन व प्रदर्शन आयोजित करण्यात…

काटा लगा फेम शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराने निधन

‘काटा लगा गर्ल’ आणि ‘बिग बॉस 13’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. 27 जून रोजी रात्री शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. खरंच, ‘काटा लगा’ फेम शेफाली जरीवाला हिच्या निधनाच्या बातमीने अनेकांच्या मनात तीव्र नॉस्टॅल्जिया दाटून आला असेल.2000च्या दशकाच्या सुरुवातीला ‘काटा लगा’ हे गाणं म्हणजे…

पुल कट्ट्याच्या नव्या पर्वाची सुरुवात — २५व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाची घोषणा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, हा सांस्कृतिक उपक्रम दि. १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नूतनीकृत अकादमीच्या नवीन खुल्या रंगमंचावर पुन्हा सुरू होत आहे. ‘पु. ल. कट्टा – कलाकारांचं…

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या 6 जूनपासून राज्यातल्या सर्व ‘आयटीआय’ मध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमिताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व…