cultural360.online

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश सरकारने निर्गमित केला आहे. यापूर्वीच देशी गायीस “राज्यमाता–गोमाता” म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे….

मसुरे सुपुत्र अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन’ सन्मान पुरस्कार

‘अर्थसंकेत’ या मराठीतील पहिल्या व्यवसाय व अर्थविषयक वर्तमानपत्राचे संस्थापक आणि संपादक  मसुरे गावचे सुपुत्र डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन मॅगझीन’तर्फे ‘बिझनेस आयकॉन’ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे २०२५’ या कार्यक्रमात त्यांच्या आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि डिजिटल माध्यमांमधील नवप्रवर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात येऊन पुरस्कारा प्रदान करण्यात…

मुक्तपीठने पाडला अनोखा पायंडा, माध्यम जगतातील बातमी जगणाऱ्यांचा केला सन्मान

आज मराठी माध्यम जगतात दरदिवशी नवनवी बातम्यांची, शब्दांची आणि तंत्रज्ञानाची क्रांती होत असताना माध्यमजगतातील तरुण माध्यमकर्मीनी जपलेली विश्वासार्हता ही प्रेरणादायी आहे. मराठी माध्यमात वृत्तनिवेदक आणि वृत्तनिर्माते यांचे पुरस्कार सोहळे असताना वृततंत्रज्ञाचा सन्मान करत मुक्तपीठ समुहाने खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा सन्मान केला आहे. मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांच्या २०२४ भाजपा जिंकली कशी या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित…

राजकोट किल्ल्यावर भव्य आरमार संग्रहालयासह प्रदर्शन, पर्यटन केंद्र उभारणार 

‘भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातले पहिले आरमार स्थापन करुन दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी. त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढी नौदल, नौवहनसेवेत यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ८३ फुट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला…

पुल कट्ट्याच्या नव्या पर्वाची सुरुवात — २५व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाची घोषणा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, हा सांस्कृतिक उपक्रम दि. १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नूतनीकृत अकादमीच्या नवीन खुल्या रंगमंचावर पुन्हा सुरू होत आहे. ‘पु. ल. कट्टा – कलाकारांचं…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घोणे काष्ठशिल्प म्युझियम आणि हॉटेल ‘आजीची आठवण’चा भव्य शुभारंभ   ; ग्लोबल कोकणच्या आर्ट व्हिलेजची ऐतिहासिक सुरुवात

कोकणातील कला, संस्कृती आणि पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ‘ग्लोबल कोकण आर्ट व्हिलेज’च्या उपक्रमाची आणि ‘घोणे काष्ठशिल्प म्युझियम’ व ‘हॉटेल आजीची आठवण’ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची भव्य सुरुवात आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात आलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या नव्या केंद्राला पहिल्याच दिवशी भेट देऊन या…

श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार

!श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र…

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. उद्या 9 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे. IRCTC, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या विशेष पाच दिवसांच्या…

डॉ. प्रमोद चौधरी लिखित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात मांडण्यात आलेले त्यांचे विचार आणि अनुभवांच्या बोलामुळे नवउद्योजकांना आणि देशासाठी काही करण्याची उर्मी असणाऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’…