‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. उद्या 9 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे. IRCTC, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या विशेष पाच दिवसांच्या…

डॉ. प्रमोद चौधरी लिखित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात मांडण्यात आलेले त्यांचे विचार आणि अनुभवांच्या बोलामुळे नवउद्योजकांना आणि देशासाठी काही करण्याची उर्मी असणाऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’…

‘शिवराज भूषण’ महानाट्यातून शिवकाळाचे स्मरण

छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजाश्रय दिलेले कवी भूषण यांच्या जीवनावर आणि त्यांनी लिहिलेल्या शिवराज भूषण या काव्यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी निर्मित केलेल्या आणि मालवणमधील कलाकारांनी आपल्या अभिनयातून साकारलेल्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मालवणातील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झाला. या प्रयोगाला नाट्य रसिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महानाट्याचा…

ज्येष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

जेष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना यंदाचा ‘बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवार, ५ जून रोजी त्यांना पत्र लिहित त्यांचे अभिनंदन केले आहे. “सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सामाजिक न्याय विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण…

ज्येष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार' जाहीर

राज्यभरातील ‘आयटीआय’ संस्थांमध्ये शिवराज्याभिषेक दिनी राष्ट्रहितावर व्याख्यानमालेद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत राज्यभरातील १०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘पंचपरिवर्तन‘ संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेची सुरुवात झाली. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाचे मूल्य रुजवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक…

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक! ईद  अल – अधा (बकरी ईद) हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, सौहार्द व समृद्धी घेऊन येवो या मंगल कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद अल अधाच्या शुभेच्छा देतो, असे…

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे. रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले….

अयोध्येत ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गर्भगृहावरील पहिल्या माळ्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.या वेळी राम दरबार आणि आठ विग्रहांची प्राणप्रतिष्ठा यानिमित्त उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा सोहळा ‘गंगा दशहरा’ या तिथीला करण्यात आला. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू…