राज्यभरातील ‘आयटीआय’ संस्थांमध्ये शिवराज्याभिषेक दिनी राष्ट्रहितावर व्याख्यानमालेद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत राज्यभरातील १०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘पंचपरिवर्तन‘ संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेची सुरुवात झाली. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाचे मूल्य रुजवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक…

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक! ईद  अल – अधा (बकरी ईद) हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, सौहार्द व समृद्धी घेऊन येवो या मंगल कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद अल अधाच्या शुभेच्छा देतो, असे…

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे. रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले….

अयोध्येत ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गर्भगृहावरील पहिल्या माळ्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.या वेळी राम दरबार आणि आठ विग्रहांची प्राणप्रतिष्ठा यानिमित्त उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा सोहळा ‘गंगा दशहरा’ या तिथीला करण्यात आला. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू…

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर संपन्न झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास लाखोंच्या संख्येत शिवप्रेमींनी कालपासून रायगडावर गर्दी केली आहे.  शिवकालीन मर्दानी व साहसी खेळांनी वातावरण शिवमय झाले होते. आज सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली. सालाबादप्रमाणे…

गोव्यात राजभाषा मराठीसाठी एकवटले मराठीजन 

मराठी राजभाषा करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीने राजभाषा मेळाव्याची घोषणा केली आहे. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, यासाठी राज्यभर 12 प्रखंड मेळावे आयोजित केले आहेत. मराठी राजभाषा निर्धार समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या मेळाव्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. प्रखंड मेळाव्यात 7 जून डिचोली, 8 जून रोजी तिसवाडी तालुक्यात मेळावा आयोजित…

गुजराती, सिंधी, उर्दु, तमिळ, तेलगू भाषिक पहिलीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार सोप्या भाषेत ‘मराठी’चे धडे

त्रिभाषा सूत्रानुसार सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यात आली. पण, महाराष्ट्रातील गुजराती, सिंधी, तेलुगू, तमीळ, उर्दू भाषिक पहिलीतील विद्यार्थ्यांना मराठी सहजपणे समजावी म्हणून स्वतंत्रपणे सोप्या शब्दांतील मराठीच्या पुस्तकांची ‘बालभारती’कडून छपाई सुरू केली आहे. मराठीबद्दलची गोडी वाढावी हा त्यामागील हेतू आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदल झाला असून…

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले….